तू सोडून जा मला अशीच दिगंतारात अधांतरी,
मी वाट पाहीन तुझी आंधळ्या तारखेपर्यंत'
धुंदावलेल्या पांढुरक्या रस्त्यांना कुम्पनांचे कुंपण,
आणि त्याच वाटेवरून ये तू पुन्हा मी जग पाहत नसल्यासारखा,
मला कोणी सांगितले नाहीत, त्यांचे पत्ते नेहमीचे,
फ़क़्त जाणाऱ्या पावलांचे ठसे, फ़क़्त निघून गेल्याच्या खुणा
मी धावत राहतो, त्या खुणांच्या पाठी , उद्या कदाचित तुझी भेट होईल ,
दूर कुठेतरी तुझी सावली, जाते क्षितिजाला चुकवून
नि मी धावत सुटतो, दुखांच्या पलीकडले शोधण्यासाठी,
देताना चार अश्रू उधार, माझा घसा कोरडा पडतो,
नि मग मी रिता उभा राहतो तसाच साहत झळा,
सलत राहतो मी, माझ्याच मनास
अन जिवंत असल्याचा आभास जाणवू लागतो
त्या खुणा माझ्याभोवती पिंगा घालू लागतात
पावलांचे ठसे माझ्या पायाला बसतात खेटून
आणि मी पुन्हा आठवू पाहतो,
पत्ता तुझा!
@भावेश 'काव्या'
SUNDER LIHILAYAS BHAVESH!
ReplyDeletethnx dear!
ReplyDeleteSuperb my dear Kavi.....god bless u.
ReplyDeletekeep it up...
feelin like ur expressing my own thoughts...
ReplyDeletethanxs for sharing wid me...
its lovely..
Nice Poem My friend!!!!!!.....
ReplyDeleteKeep it up:-)
thnx frnds for encouraging me
ReplyDeletethese poems ,writings are just true feelings,reflections and impressions of my mind ...some i experience ,some i imagine...