Thursday, October 14, 2010

गझल

(हि गझल लिहिताना मात्रांत बांधायचा प्रयत्न केला आहे,हा अजून एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आनंद देण्याचा ;आवडेल अशी खात्री बाळगतो)

किती लपावे अंधारी पण जगाचा नेम नाही
काटे बोचरे केतकीस अन अश्रूंचा थेंब नाही

जखमा दिल्यात त्यांनी जे घेऊन गेले स्वप्न
आता पाखरे परतीस पण स्वप्नांस भेट नाही

जगता आयुष्य माझे ,मी केवळ निमित्त
आता एवढे उपकार,पण जगण्या उमेद नाही

मदहोशी काय होती ,येथे हृदयास भंग
आता सावरे स्वत:स ,अन चंद्रास झोप नाही

जगले कित्येक निखारे पेटते सुन्न
आता पावले पेटती पण मनास खेद नाही

@भावेश 'काव्या'

No comments:

Post a Comment